BY - युवा महाराष्ट्र लाइव - ठाणे
ठाणे जिल्ह्यात लॉकडाऊन सध्या करण्यात येणार नाही त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवु नये.आठवडाभरानंतर परिस्थितीचे अवलोकन करून पुढील निर्णय घेण्यात येतील. असे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. ग्रामीण भागातील सर्व ५वी ते १२ वी पर्यतच्या शाळा सध्या सुरु आहेत. दहावी व बारावीचे वर्ग वगळता अन्य सर्व वर्गांच्या शाळा पुढील आदेशापर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश पालकमंत्री यांनी दिले. ऑनलाईन पद्धतीने शाळा सुरु राहतील. शिक्षणविभागाच्या निर्देशांचे पालन करणे शाळांवर बंधनकारक असेल
Post a comment