BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
राज्यभरात मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम दि. 15 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला असून प्रारुप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र मतदारांची नाव नोंदणी आणि समाविष्ट नोंदींबाबत आक्षेप किंवा त्यामध्ये दुरूस्ती वा सुधारणा करावयाच्या असल्यास संबंधितांनी विहित नमुन्यात अर्ज करावेत, असे आवाहन राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या कार्यालयाकडून करण्यात आले आहे. तसेच दि. 5, 6, 12 आणि 13 डिसेंबर 2020 या सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी विशेष मोहीमदेखील आयोजित करण्यात येणार असल्याचेही कळविण्यात आले आहे.
Post a comment