महात्मा गांधींची ‘आत्मनिर्भर भारत’ संकल्पना साकार करणे सर्वांचे कर्तव्य : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
सेवाग्राम येथे वास्तव्य असताना महात्मा गांधींनी आत्मनिर्भर
भारताची आधारशीला मांडली. गांधीजींच्या संकल्पनेतील आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार
करणे हे सर्वांचे कर्तव्य आहे व तीच त्यांना सच्ची आदरांजली ठरेल, असे प्रतिपादन राज्यपाल
भगतसिंह कोश्यारी यांनी केले.वर्धा येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिन्दी विद्यापीठाने
गांधीजींच्या १५१ व्या जयंती वर्ष समारोपानिमित्त ‘दीपोत्सव’ तसेच ई- पुस्तकाचे प्रकाशन
आयोजित केले होते, त्यावेळी राजभवन येथून दूरस्थ पद्धतीने सहभागी होताना राज्यपाल बोलत
होते.
No comments