BY - युवा महाराष्ट्र लाईव्ह - मुंबई
गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा. कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात ‘मिशन बिगीन अगेन‘ करण्यात आले असले तरी आपण सगळ्यांनी यापुढील काळातही काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी आपण आपल्या सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देत यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करूया. जगावर आलेले हे संकट टळूदे, पुन्हा एकदा जनजीवन गतिमान होऊ दे, अशी प्रार्थनाही गणरायाला आपण सर्वांनी करूया असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले आहे.
Post a comment