BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
राज्यात आज ४५०० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे
प्रमाण ५५.६७ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ४९ हजार ००७
झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ६७४१
नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ७ हजार ६६५ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत,
अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या
१३ लाख ७२ हजार नमुन्यांपैकी २ लाख ६७ हजार
६६५ नमुने पॉझिटिव्ह (१९.४९ टक्के) आले आहेत. राज्यात ६ लाख ९८ हजार ८५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये
आहेत. सध्या ४२ हजार ३५० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.राज्यात आज २१३ करोनाबाधित
रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४ टक्के एवढा आहे.राज्यात
नोंद झालेले २१३ मृत्यू हे मुंबई मनपा-७०, ठाणे-१५, ठाणे मनपा-१५, नवी मुंबई मनपा-८,
कल्याण-डोंबिवली मनपा-७, उल्हासनगर मनपा-७, भिवंडी-निजामपूर मनपा-१२, वसई-विरार मनपा-८,
रायगड-२, पनवेल मनपा-१, नाशिक-१, नाशिक मनपा-५, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-२, धुळे मनपा-२,
जळगाव-७, जळगाव मनपा-१, पुणे-६, पुणे मनपा-१०, पिंपरी-चिंचवड मनपा-९, सोलापूर-३, सोलापूर
मनपा-३, सातारा-१,सांगली मिरज कुपवाड मनपा-१, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-४, परभणी-१,
परभणी मनपा-१, लातूर-२, नांदेड-३,अकोला-१, बुलढाणा-१, नागपूर मनपा-१, भंडारा-१ या जिल्हा
आणि मनपा क्षेत्रातील आहे.
Post a comment