BY - युवा महाराष्ट्र लाइव - मुंबई |
‘वंदेभारत’ अभियानांतर्गत मुंबई विमानतळावर २५ हजार ६२० प्रवाशांचे
आगमन झाले असून यामध्ये मुंबईतील प्रवाशांची संख्या ९ हजार ३९१ इतकी आहे. उर्वरित महाराष्ट्रातील प्रवासी
८ हजार ५७६ असून इतर राज्यातील प्रवाशांची संख्या ७ हजार ६५३ आहे.हे प्रवासी १६६ विमानांनी
मुंबईत दाखल झाले आहेत. १ जुलै २०२० पर्यंत फेज ३ च्या उर्वरित १५ तसेच फेज ४ च्या २१ अशा एकूण
३६ विमानातून प्रवासी मुंबईत येणे अपेक्षित आहे.परदेशात अडकलेल्या महाराष्ट्रातील व
इतर राज्यातील नागरिकांना या अभियानांतर्गत मुंबईत उतरून घेऊन त्यांना क्वारंटाईन करून
घेण्याची व्यवस्था महाराष्ट्र शासनामार्फत पार पाडली जात आहे.
Post a comment