BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
राज्यातील 52
हजार 438 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरू असून 1 जून ते 18
जून पर्यंत राज्यातील 96 लाख 38 हजार 291 शिधापत्रिका धारकांना 33 लाख 80 हजार 90
क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले आहे. तसेच 18 लाख 39 हजार 486 शिवभोजन
थाळ्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक
संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा
योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील
पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे. या लाभार्थ्यांना 52 हजार
438 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. या योजनेमधून सुमारे 13 लाख 13 हजार 554 क्विंटल
गहू, 10 लाख 8 हजार 256 क्विंटल तांदूळ, तर 13 हजार 817 क्विंटल साखरेचे
वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरीत झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात
अडकलेल्या 2 लाख 45 हजार 129 शिधापत्रिका धारकांनी ते जेथे राहत आहे त्याठिकाणी
शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.प्रधानमंत्री
गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत एप्रिल ते जून पर्यंत प्रती लाभार्थी प्रती महिने 5
किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 1 जून पासून एकूण 33 लाख 28 हजार 544
शिधापत्रिकांवर मोफत तांदूळ वाटप केले आहे. या शिधापत्रिकांवरील 1 कोटी 43 लाख 46
हजार 25 लोकसंख्येला 7 लाख 42 हजार 670 क्विंटल तांदुळाचे वाटप झाले
आहे. राज्य शासनाने कोविड-19 संकटावरील उपाययोजनेसाठी 3 कोटी 8 लाख 44
हजार 76 एपीएल केसरी लाभार्थ्यांना मे व जून 2020 या 2 महिन्यासाठी प्रती व्यक्ती
5 किलो धान्य सवलतीच्या दराने (गहू 8 रुपये प्रति किलो व तांदूळ 12 रुपये प्रति
किलो) देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याचे जून 2020 मध्ये आतापर्यंत 2 लाख 79
हजार 930 क्विंटल वाटप केले आहे.
Post a comment