BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई |
संपूर्ण भारतात लॉकडाउन झाल्यानंतर सध्या सर्व व्यवसाय थांबले
आहेत. दररोज शारीरिक कष्ट करणारे मजूर, कामगार व व्यावसायिक यांचे जीवन या कालावधीत
सुखकर व्हावे यासाठी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी शासन स्तरावर
आवश्यक असणारे निर्देश दिले आहेत.लॉकडाऊनमुळे 26 मार्चनंतर संघटित व असंघटित मजुरांचे उपजीविका साधन थांबल्यामुळे विशेष आर्थिक पॅकेज
देण्याबाबत कामगार आयुक्तांना सूचना दिल्या, तसेच 27 मार्च रोजी कामगारमंत्री दिलीप
वळसे-पाटील यांना पत्र पाठविले. उपसभापती कार्यालय
हे मुख्यमंत्री कार्यालय आणि कामगार विभाग कार्यालय यांच्या संपर्कात आहे. लॉकडाऊन
कालावधीत शासनाने अनेक उपाययोजना जाहीर केल्या व त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.
कामगारांसाठीची प्रस्तावित मदत लवकरच जाहीर होईल अशी अपेक्षा असल्याचे असे डॉ. नीलम
गोऱ्हे यांनी स्पष्ट केले.
Post a comment